राजाराम (खां) येथील न्यू स्टार बौध्द मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिन.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उमाजी शेगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.
अहेरी:-विश्वरत्न,विश्वभूषण,महानायक, क्रांतीसूर्य,प्रज्ञासूर्य, महान इतिहासकार,अर्थशास्त्रज्ञ युगपुरुष, बोधीसत्व आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे फक्त स्मरणाचा दिवस नाही, तर विचार प्रबोधनाचा आत्मचिंतनाचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या शपथेचा दिवस आहे.
बाबासाहेबांनी दिलेले स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि मानवतेचे मूल्य आजही प्रत्येक भारतीयाला मार्गदर्शक आहेत.त्यांच्या संघर्षातून निर्माण झालेल्या एका नव्या भारताचे आपण ऋणी आहोत.महामानवांच्या कार्याला वंदन करणे म्हणजे त्यांच्या विचारांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणे हीच खरी श्रद्धांजली आहे.
अहेरी तालुक्यातील राजाराम (खां) येथे न्यू स्टार बौध्द मंडळाच्या वतीने 69 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष उमाजी शेगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. कार्यक्रमाला उपस्थित मंडळाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे, सचिव भीमराव गोंगले, उपाध्यक्ष तिरुपती दुर्गे, पत्रकार मधुकर गोंगले, पत्रकार सुरेश मोतकुरवार, सुधाकर गोंगले, राजेश दुर्गे, गोविंदा गोंगले, संतोष दुर्गे, जयराम दुर्गे, तुळशीराम झाडे, जितेंद्र झाडे, हणमंतू झाडे, सदाशिव गोंगले, किशोर गोंगले, व्येकटेश गोंगले, विलास दुर्गे, शंकर गोंगले, जीवन डुरके, प्रमोद दुर्गे, शंकर झाडे, रवी दुर्गे, व्येकटी दुर्गे, गणपत दुर्गे, नामदेव दुर्गे, राकेश ओंडरे, सोनलाल बोरकर, नितेश शेगावकर, नाना शेगावकर, श्रीनिवास झाडे, आशिष शेगावकर, कृष्णा शेगावकर, धनंजय शेगावकर, बानाया दुर्गे, मारोती दुर्गे, तुळशीराम बोरकर, बोन्दय्या दुर्गे, आयुष्यमती, लिंबुना गोंगले, रेखा गोंगले, उज्वला गोंगले, वंदना दुर्गे, रंजना दुर्गे, यशोदा दुर्गे, पुष्पा दुर्गे, सुशीला दुर्गे, पेंटूबाई दुर्गे, सुरेखा दुर्गे, लक्ष्मीबाई गोंगले, छाया शेगावकर, नेपाली चालूरकर, लक्ष्मी झाडे, पौर्णिमा झाडे, कमलाबाई दुर्गे, लक्ष्मी दुर्गे, आदी बौध्द उपासक, उपासिका मोठया प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मनोज आकदर यांनी केले.
“शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा”!!
हे सदैव प्रेरणा देणारे महामंत्र आजही तितकेच सामर्थ्यशाली आहेत. जन्मापासूनच त्यांना अस्पृश्यतेच्या जाचक बेड्या सहन कराव्या लागल्या. पाण्याच्या टाक्याला हात लावला म्हणून अपमान सहन करावा लागला. शाळेत वेगळे बसावे लागले, गुरुजीही पाणी प्यायला देत नव्हते… तरीही त्यांनी शिक्षण सोडले नाही. कोल्हापूरच्या महाराजांच्या मदतीने, स्वतःच्या अथक परिश्रमाने त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. लंडनमधून बार-ऍट-लॉ आणि डी.एस्सी. पदवी मिळवली. जगातील सर्वाधिक शिकलेले नेते म्हणून त्यांचा आजही आदर केला जातो. पण बाबासाहेबांनी शिक्षण फक्त स्वतःसाठी घेतले नाही. ते परत आले आणि म्हणाले,“शिका! संघटित व्हा!! संघर्ष करा!”
