दामरंचा येथील कोमरय्या सुरमवार मृत्यू प्रकरण जाणार मुख्यमंत्र्याच्या दारी…!
प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देणार असल्याचे माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांचे पीडित कुटुंबाला दिले आश्वासन.
अहेरी(गडचिरोली):– अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील रहिवासी असलेले कोमरय्या सुरमवार यांचा मृत्यू अत्यंत संशयास्पद परिस्थितीत 24 ऑक्टोंबर 2025 रोजी झालेला होता,सदर प्रकरणामुळे कुटुंबीय व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता व संताप निर्माण झाला आहे.आजपर्यंत झालेली चौकशी अपुरी व असमाधानकारक होती.गेल्या तीन महिन्या पासून खऱ्या दोषींवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे पीडित कुटुंबाचे म्हणने आहे.
त्यामुळे सुरमवार कुटूंबातील सदस्यांनी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांना निवेदन देऊन कोमरय्या सुरमवार यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सर्व आरोपीना शिक्षा देऊन सुरमवार कुटूंबाला न्याय मिळवून द्या अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
निवेदन स्वीकारून राजे साहेबांनी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या प्रकरणाची संबंधित यंत्रने मार्फत सखोल व स्वतंत्र चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करून कुटुंबाला न्याय मिळवून देणार असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
तसेच पीडित कोमरय्या सुरमावर यांच्या कुटूंबाला संरक्षण,योग्य कायदेशीर मदत मिळावी,यासाठीही आपण विशेष लक्ष घालानार,असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी निवेदन देतांना ज्योती कोमरय्या सुरमवार, निर्मला मुलकालवार, शकुंतला चौधरी, सरोजना सुरमवार, रजनीता सुरमवार तसेच दामरंचा येथील गावकरी उपस्थित होते.
