
अपघातात स्कॉर्पिओ गाडीचा समोरील उजव्या बाजू चक्काचूर झाला.
आलापल्ली(गडचिरोली):-एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज वाहतुकीमुळे आणि अवजड वाहनांमुळे तालुक्यात अनेक समस्या निर्माण होत आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचे उत्खनन होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, तसेच स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
दि. ०४ जुलै २०२५ रोजी दुपारी-१२.३० वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील वेलगुर टोला वळणाजवळ एक भीषण अपघात घडला. सुरजागड खाणीतून लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक (MH-३४ BZ-६८०२) आणि स्कॉर्पिओ (MH-३३ Y-९९९१) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.
अपघातात स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरशः समोरील उजव्या बाजूचा चक्काचूर झाला. सदर स्कॉर्पिओ गाडी अमीत येनपेरेड्डीवार यांची असून, ते स्वतः चालक होते. त्यांच्या सोबत विशेष भटपलीवार हे देखील गाडीत होते.
अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची वेगमर्यादा, ओव्हरलोडिंग व रस्त्याची धोकादायक स्थिती हे संभाव्य कारण म्हणून स्थानिकांकडून चर्चिले जात आहे.