दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण
. शासनाने जाहिर केले होते एकुण 10 लाख रूपयाचे बक्षिस.
शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 693 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 08 जानेवारी 2025 रोजी दोन जहाल महिला माओवादी नामे 1) शामला झुरु पुडो ऊर्फ लीला, कंपनी क्र. 10 पीपीसिएम/सेक्शन कमांडर, वय 36 वर्ष, रा. गट्टेपल्ली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली व 2) काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी, भामरागड दलम सदस्य, वय 24 वर्षे, रा. नेलगंुडा, ता. भामरागड, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती
1) शामला झुरु पुडो ऊर्फ लीला
दलममधील कार्यकाळ
श्व् शामला झुरु पुडो ऊर्फ लीला ही 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या माओवादी चकमकीत मारल्या गेलेल्या डिकेएसझेडसीएम रुपेश मडावी ऊर्फ सांबा याची पत्नी आहे.
श्व् सन 2002 मध्ये चामोर्शी दलम मध्ये सदस्य पदावर भरती होवून काम केले.
श्व् सन 2002 मध्ये प्लाटुन क्र. 03 मध्ये बदली होऊन सन 2007 पर्यंत काम केले.
श्व् सन 2007 मध्ये कंपनी क्र. 04 मध्ये बदली होऊन सन 2008 पर्यंत काम केले.
श्व् सन 2008 मध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन सेक्शन कमांडर म्हणून कंपनी क्र. 04 मध्ये सन 2010 पर्यंत काम केले.
श्व् सन 2010 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन सेक्शन कमांडर या पदावर राहुन आजपावेतो काम केले.
कार्यकाळात केलेले गुन्हे
तिच्यावर आजपर्यंत एकुण 45 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 21 चकमक, 06 जाळपोळ, व 18-इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
2) काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी
दलममधील कार्यकाळ
श्व् माहे जानेवारी 2018 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो कार्यरत.
कार्यकाळात केलेले गुन्हे
तिच्यावर आजपर्यंत एकुण 08 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 04- चकमक, 01- जाळपोळ, व 03- इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
आत्मसमर्पीत होण्याची कारणे.
गडचिरोली पोलीसांच्या सततच्या गस्तीमुळे जंगलात फिरणे कठिण झाले होते.
नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असल्यामुळे स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.
खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
माओवादी दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.
वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
शासनाने जाहिर केलेले बक्षीस
महाराष्ट्र शासनाने शामला झुरु पुडो ऊर्फ लीला हिचेवर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
महाराष्ट्र शासनाने काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी हिचेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन शामला झुरु पुडो ऊर्फ लीला हिला एकुण 5.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 46 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सन-2025 च्या पहिल्याच आठवड¬ात 13 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले, ज्यामध्ये 01 जानेवारी 2025 रोजी मा. मुख्यमंंत्री महाराष्ट्र राज्य यांचे समोर 11 वरिष्ठ कॅडरच्या माओवाद्यांचाही समावेश होता. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. जसवीर सिंग, कमांण्डट 113 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.